Ad will apear here
Next
मोदी सरकारच्या शपथविधीवेळी रत्नागिरीत जल्लोष
पंतप्रधानपदाची शपथ नरेंद्र मोदी यांनी घेतल्यानंतर आमदार उदय सामंत यांना लाडू भरवताना नगरसेवक उमेश कुळकर्णी आणि सचिन वहाळकर.

रत्नागिरी : फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा गजर आणि ‘मोदींचा विजय असो’, ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ अशा जल्लोषपूर्ण वातावरणात रत्नागिरीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शपथविधी सोहळा साजरा करण्यात आला.

पंतप्रधानपदी दुसऱ्यांदा विराजमान होणारे मोदी आणि भाजप सरकारमधील अन्य मंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याचे थेट प्रक्षेपण रत्नागिरी शहर भाजप, भाजयुमोतर्फे मारुती मंदिर येथे दाखवण्यात आले. भव्य एलईडी स्क्रिनवर हा सोहळा पाहण्यासाठी या वेळी मोदीप्रेमींनी एकच गर्दी केली होती. या वेळी रत्नागिरीकरांना बुंदीचे लाडूंचे वाटपही करण्यात आले. 


मोदी दुसर्‍यांदा पंतप्रधान झाले; तसेच भाजपला २०१४च्या निवडणुकीपेक्षा अधिक जागा मिळाल्या. मोदी शपथ घेताना रत्नागिरीकरांना पाहता यावे यासाठी मारुती मंदिर येथे एलईडी स्क्रिन लावली होती. या स्क्रिनवर शपथविधीचा सोहळा पाहण्यासाठी भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व रत्नागिरीकरांची भरपूर गर्दी झाली होती. भाजपचे झेंडे सर्वत्र झळकल्याने वातावरण भाजपमय झाले होते. मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी व ढोल-ताशांचा गजर करण्यात आला; तसेच एक हजारांहून अधिक लाडू वाटप करण्यात आले. 

शहर भाजपतर्फे लावण्यात आलेल्या एलईडी स्क्रिनवर शपथविधी सोहळा पाहण्यासाठी उपस्थित नागरिक.

या वेळी अ‍ॅड. बाबा परुळेकर, अ‍ॅड. विलास पाटणे, अ‍ॅड. दीपक पटवर्धन, सचिन वहाळकर, भाजप-शिवसेनेचे नगरसेवक, अविनाश साटम, महेंद्र मयेकर, मंदार मयेकर, मनोज पाटणकर, सतीश शेवडे, शहर सरचिटणीस उमेश कुलकर्णी, बिपीन शिवलकर, आमदार उदय सामंत, नगराध्यक्ष बंड्या साळवी, ऐश्‍वर्या जठार, अ‍ॅड. साखळकर आदींसह अनेकजण उपस्थित होते.


 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/SZKWCA
Similar Posts
नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीप्रीत्यर्थ पुण्यात जल्लोष पुणे : भारताचे १५ वे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी, ३० मे २०१९ रोजी शपथ घेतली. सलग दुसऱ्यांदा ते या पदावर विराजमान झाले आहेत. त्यांच्या शपथविधी सोहळ्याप्रीत्यर्थ पुण्यात ठिकठिकाणी मोदी समर्थकांनी जल्लोष केला.
‘नवभारत निर्मितीच्या मार्गावर जाणारा अर्थसंकल्प’ नवी दिल्ली : देशाच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री असलेल्या निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी, पाच जुलै रोजी त्यांचा पहिला अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला. या अर्थसंकल्पात शेती, ग्रामीण विकास, कौशल्य विकास, गरिबांना सोयी-सुविधा, संशोधन, डिजिटल अर्थव्यवस्था, महिला सक्षमीकरण यावर भर देण्यात आला आहे. ‘हा
अरुणास्त! भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली (६६) यांचे २४ ऑगस्ट रोजी दुपारी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात प्रदीर्घ आजाराने निधन झाले. विद्यार्थिदशेपासूनच कार्यकर्ता म्हणून राजकारणात आलेल्या या नेत्याने आपल्या कर्तृत्वाने उत्तुंग शिखरे पादाक्रांत केली. या नेत्याच्या कारकिर्दीचा हा अल्प आढावा
पंतप्रधानांना मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशभरातून मिळालेली स्मृतिचिन्हे, मानचिन्हे आणि भेटवस्तू आता तुमच्या घरातही असू शकतात. होय! हे खरे आहे. कारण पंतप्रधानांना मिळालेल्या विविध स्मृतिचिन्हांचा आणि भेटवस्तूंचा लिलाव आयोजित करण्यात आला असून, त्यातून उभा राहणारा निधी ‘नमामि गंगे’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी दिला जाणार आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language